facebook

Saturday, December 23, 2017

प्रवास



दहावीच्या परीक्षेनंतर,माझी एक मैत्रीण तिच्या कुटुंबाबरोबर Europe trip ला गेली. मला खूपच हेवा वाटला होता तिचा.तेव्हा मी काय?माझ्या घरातलं कुणीही विमानात बसून भारतातल्या भारतात पण फिरलं नव्हतं . Europe म्हणजे नक्की कुठ- कुठले देश हे मी नकाशा शोधून त्यावरती बघितलं होतं. खरतर तोपर्यंत मी  फक्त महाराष्ट्रातल्या वेग वेगळ्या शहरात प्रवास केला होता . जिथे नातेवाईक आहेत, किंवा देवदर्शन होणे आहे, तिथे आमची Family प्रवास करायची. म्हणजे त्या वेगळ्या शहरात जाऊन हॉटेलात वगैरे न राहता आम्ही नातेवाइकांच्या घरीच रहायचो. प्रवास शक्यतो लाल गाडीच्या किंवा नीम आराम बस मधून घडायचा.  हे सगळे प्रवास मला खूप 'uncool' वाटायचे. एका ओळखीच्या ठिकाणाहून , दुसरया ठिकाणी ओळखीच्या लोकांना भेटायला जायचं, त्या त्या गावची speciality काय,हे त्या गावातले नातेवाईक सांगतील तेच मान्य करायचं, घरातलच साग्रसंगीत, रुचकर जेवण जेवायचं. मग बदल असा तो काय ? Adventure चा असा काही scopeच नाही. ह्या अशा प्रवासाला अपवाद अशा, तोपर्यंतच्या आयुष्यात दोनच आठवणी -किहीम ला निव्वळ मजा म्हणून गेल्याचं , आणि पौर्णिमेच्या रात्री रायगड चढण्याचा ट्रेक. ह्या दोन्ही वेळेला आम्ही Home stay मध्ये राहिलो होतो...घरी राहण्यापेक्षा वेगळं ,पण तरीही त्या मध्ये 'independance' नाही.
ट्रेकला गेल्यावर Independace असायचा. वाटेतल्या छोट्या गावांच्या मंदिरात किंवा ओसरीवर sleeping bags किंवा गोधड्या घालून झोपायचो. घरून शिधा नेलेली असायची, पण चुलीवर स्वैपाक करायला , त्यासाठी काटक्या, लाकडं गोळा करणं मला फार आवडायचं. कधीतरी हाताला चटका बसायचा, धूर घशात जायचा, खिचडी किंवा रास्स्यातले बटाटे अर्धे कच्चे राहायचे.  पण चांदण्या रात्री , अंधारात ,गप्पा -टप्पांमध्ये कुणीतरी वेगळ्याच एखाद्या ट्रेक बद्दल बोलायला लागायचं,कधीही नाव न ऐकलेल्या  गावातल्या सरपंचाची गोष्ट रंगून डोळ्यासमोर उभी रहायची,  एखादा गावकरी चौकशीला यायचा आणि मग गावाबद्दल , स्वतः बद्दल सांगात, शेकोटीला उब घेत, तंबाखू चोळत बसायचा. कधीतरी दोन -तीन  गावकरी केरोसीन lamp घेऊन यायचे  आणि साप , रान मांजरानबद्दल चेतावणी द्यायचे . थोडं असुरक्षित वाटायचं, पण पुण्यातल्या 'sheltered' जगण्यापेक्षा हे रम्य होतं आणि छान वेळ जायचा. भुताच्या गोष्टी सुरु झाल्या की मी कान बंद करून घेत, कधी झोपेचं सोंग आणत असे.  झोपताना आसपासच्या झाडांच्या पानांची सळसळ, साप बीप माझ्याच अंथरुणात शिरण्याची शक्यता , रात्री torch घेऊन अंधारात स्वतःपुरती नवीन 'बाथरूम' शोधणं- ह्यात वेग वेगळे अनुभव असायचे.  असंच 'वेगळं' आयुष्य जगण्याची हुरहूर वाटायची.
एकदा , चार दिवसाच्या ट्रेक मध्ये माझा पाय पहिल्याच दिवशी इतका सुजून आला, blistersआले , की दुसऱ्या दिवशी slipper घालून चालायला लागलं. एकदा गवताच्या ढेप्यांवर पांघरुण अंथरून आम्ही १५ जण झोपलो पण मला एकटीलाच त्याचा rash आला.  एकदा शेकोटी फुंकताना, माझे केस थोडे जळाले !;) असं काही झालं की मला मी 'वेगळी' आहे असं वाटायचं. आणि त्या वेगळेपणामुळे मला चेव चढायचा -अजून वेगळेपण सिद्ध करायचा. मग सगळे हसत खेळत असले के उगाच आकाशाकडे बघायचं, वही मध्ये काहीतरी खरडायचं. मग तू काय विचार करते आहेस असं विचारण्यापेक्षा, माझी चेष्टाच केली जायची.. मला माहित होतं की मी आव आणून वागते आहे पण अशी वेग वेगळी 'पात्र' एकत्र प्रवास करत नसतील तर मग नाट्य कुठून निर्माण होणार?
 तर Europe trip चं कळल्यावर हे सगळं माझ्या डोक्यातून गेलं. आपल्या देशापेक्षा  वेगळे लोक, वेगळी भाषा, वेगळी शहरं, वेग वेगळ्या 'हॉटेल्स' मध्ये वास्तव्य - माझी मैत्रीण एकदम केवढी समृद्ध होऊन येणार असं मला वाटलं. मी मात्र तिथेच good old पुण्यात, माझ्यामध्ये तीळमात्र ही बदल किंवा growth न होता , ती गेली तेव्हा होते, तशीच ती आल्यावरही असणार !
पण मग माझ्या बहिणीने मला दिल्लीला राष्ट्रीय नाट्य विद्यालयात बोलवून घेतलं. एवढा प्रदीर्घ रेलवे प्रवास मी कधीच केला नव्हता. माझ्या बरोबर मला सोडायला बाबा दिल्लीला येणार होते,त्यांनी निझामुद्दीनची दोन टीकिट्स काढली. त्यावेळेला mobile , Ipad काहीच नव्हते. त्यामुळे entertainment म्हणजे पुस्तक वाचणे , गप्पा मारणे, खिडकी बाहेर बघत मनन करणे, गाणी गुण गुणणे, खाणे आणि झोपणे एवढेच मला माहित होतं. बाबा बरोबर असले की आपण वेगळं काही वाचायला घेतलं नाही तरी चालतं.त्यांच्याकडे कुठल्याही वायोगटातल्या  माणसांना वाचता येतील,अशी एक दोन तरी पुस्तकं असतात. ते सढळ हाताने, काहीही विकत घायला पैसे देतात.त्यामुळे मी जास्त लक्ष, ताईच्या मित्र मैत्रिणीनसमोर 'posh' दिसण्यासाठी काय कपडे घालता येतील,ह्याच्याकडे दिलं.  आईने दिलेला डब्बा 'घरीच विसरला' असं नाटक करण्याची मी तयारी केली होती , पण बाबांनी तो त्यांच्या bag मध्ये आधीच भरून ठेवला होता.
अशी तयारी करून , Europe नाही तर निदान भारतातला वेगळा प्रांत, देशाची राजधानी,पाहिला मी आणि बाबा निघालो.  ट्रेन मध्ये बसल्यावर बाबांनी मला १०० ची नोट हातात दिली आणि म्हणाले - "तुला हवं आहे ते घे, पण हिशेब लक्षात ठेव."  त्यानंतर एक पुस्तक उघडून पाच दहा मिनिटात त्यांच्याच विश्वात मग्न होऊन गेले.त्या प्रवासात मी पाणी प्यायले नाहीच बहुतेक. अतिशय टाकाऊ प्लास्टिकच्या ग्लास मध्ये दोन croutons आणि भरपूर मिरं घातलेलं टोमॅटो सूप मला इतकं आवडलं होतं,की बहुदा त्या फेरीवाल्याचा सगळा पिंप मीच संपवला असणार ! आणि चंबलच्या घाटा्वर पडलेल्या,संधीप्रकाशाच्या छटा  बघत  असताना,खाललेली, बटाटा आणि लाल हरबरा घातलेली भेळ, मी अजूनही विसरले नाहीये.. तो दिल्लीचा  प्रवास , माझ्यासाठी माझा
 खरा पहिला प्रवास होता.
दिल्लीला राष्ट्रीय नाट्य विद्यालयात, लोकांशी बोललं की कळायचं ,देशातल्या किती वेगवेगळ्या प्रांतातून वेग वेगळी हिंदीभाषा ,प्रवास करून, विद्यालयात मुरली आहे ते . बहुतेक विद्यार्थी  , track pant आणि Tshirt मध्येच फिरत होते, त्यामुळे मी posh कपडे घालण्याची काही भानगडच नव्हती. मी दोन दिवस तेच कपडे घातले तरी कुणाचं बिघडत नव्हतं, दर रोज अंघोळ केली नाही तरी चालत होतं. दर रोज 'सुरेश' च्या चहाच्या टपरी बाहेर वेगवेगळ्या लोकांची ओळख होत होती. सकाळ, दुपार, संध्याकाळ वेग वेगळ्या नाटकांच्या तालमी बघायला मिळत होत्या. १८८० मध्ये Henrik Ibsen ह्या नोर्वेगीअन नाटककाराने लिहिलेलं "Wild Duck" नाटकाची तालीम नुकतीच सुरु झाली होती.  जी मंडळी कधी भारतातून बाहेर गेली नाहीत,  नॉरवे हा देश कसा, भाषा कशी हे माहित नाही, ती आत्म चिंतन करून , पानावर लिहिलेल्या शब्दात तल्लीन होऊन, एक जग साकारण्याच्या मागे होती.  माणसं  असं कल्पनाविश्व साकारू शकतात हे अर्थातच वाचनात आलं होतं  पण ते प्रत्येक्ष पाहिल्यामुळे माझी समज वाढली... मला किती किती ठिकाणी फिरण्याच्या वाटा मोकळ्या झाल्या.कक्षा रुंदावल्या म्हणतात न तसच काहीसं ..वेगळे अनुभव घेण्याकरता मी 'वेगळं' असण्याची गरज नव्हती.
जसा तो दिल्लीचा प्रवास ताईने घडवला , तसा नुकताच तिने एका किटलीचा घडवला.. पुण्याच्या सोनल हाल ला विकत घेतलेली  ही किटली , plane cargo मध्ये बसून आमच्या घरी अमेरिकेत आली.
 किटलीतला चहा  पिण्यात एक वेगळीच नजाकत आहे जी चहाच्या भांड्यातून कपात ओतण्यात नाही. English tea ची तल्लफ, मी ह्या Mexican design च्या किटलीतून चहा पिऊन घालवते.  High tea enjoy करायला लागणारं शांत अवकाश आत्ता माझ्याकडे नाही, बरेचदा मी सकाळचा चहा microwave करत करत , १० वाजेपर्यंत पितच आसते. ह्या किटलीतून मी काहवा , अमृततुल्यातला चहा, गवतीचहा आलं घातलेला चहा, मित्र मैत्रिणींबरोबर घेतलेला चहा, चहाचं सगळं विश्वरूप ह्या किटलीत सामावतं .
 बाकी सब मन का तो खेल है ! माझ्या ह्या प्रवासाबद्दल लिहिता लिहिता मी जाऊन आलेल्या सगळ्या जागांना मी पुन्हा भेट देऊन आले , ती पूर्वी bore वाटणारी शहरं सुद्धा!


No comments:

Post a Comment